कवि सरकार इंगळी यांना आदर्श पत्रकार अमृत गौरव पुरस्कार जाहीर., वांद्रा मुंबई येथे होणार सन्मान .
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार २०२४ साठी हातकणंगाले तालुक्यातील इंगळी गावचे प्रसिद्ध पत्रकार लेखक कवि सरकार( विलास पाटील ) इंगळी यांना आदर्श पत्रकार अमृत गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे .
कवि सरकार इंगळी यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . मुंबई वांद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह स्वामी विवेकानंद रोड एसव्ही रोड येथे २५ ऑगस्टला मान्यवरांच्या हस्ते देणेत येणार आहे . असे निवडपत्र त्यांना मुख्य संयोजक समितीचे पदाधिकारी यांना दिले आहे . मा नागेश हुलावळे ' संस्थापक वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई . नॅशनल लायब्ररी ' डि पी .ई सोसायटी वांद्रा नाईट हायस्कूल त्याचप्रमाणे रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर प्रमोद सुर्यवंशी मुंबई योगेश हरणे पुणे व आयोजक समिती सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत .
टिप्पण्या