येळावीत पाण्याची टाकी भरुन गटारीत लाखो लिटर पाणी वाया . ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
यड्राव (प्रतिनिधी ) येळावी (ता . पलूस ) येथे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेले वॉटर ATM ची पाण्याची टाकी भरुन अतिरिक्त पाणी ओसंडून गटारीत वाहत आहे . मात्र याकडे ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने नागरिकांंच्यातून संतापाची लाट उसळत आहे . सध्या या वर्षी पाऊस कमी पडल्याने नदी पात्रात पाणी कमी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे . पण इकडे ग्रामपंचायतीच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षपणामुळे पाण्याची टाकी पाणी भरुन गटारीत वाहू लागले आहे . वेळीच ग्रामपंचायतीने लक्ष दिले , तर गावाला पाणी टंचाईच्या भयानक परिस्थितीच्या सामोरे जावे लागणार नाही . यापूर्वी ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी वारंवार सूचना व तक्रार देऊनही सरपंच व ग्रा . प . चे पदाधीकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांंच्यातून बोलले जात असल्याचे ऐकावयास येत आहे . त्यामूळे सदर पाण्यासाठी लागणारी वीजेच्या बिलाचा भार नागरीकांच्यावर पडत आहे . त्यामूळे नागरिकांंच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे .
टिप्पण्या