पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिव्यांग वृद्ध माता पिता यांना फटाके आणि मिठाई वाटप करत केली आपली दीपावली साजरी - समाजसेविका अनंतलक्ष्मी कैलासन

इमेज
कोंढवे धावडे - श्रावस्ती फाउंडेशन दिव्यांग मुलामुलींची शाळा,श्री स्वामी अंगण वृध्दाश्रम व विसावा सोशल फाउंडेशन येथे एन्जॉय ग्रूप पुणे यांच्या वतीने दिवाळी साठी फटाके व मिठाई वाटप करत थोर समाजसेविका सौ. अनंतलक्ष्मी कैलासन यांच्या शुभहस्ते देत आपली दिवाळी एका अनोख्या उपक्रमाने साजरी करत जिथं गरज तिथेच मदत अनोखा संदेश देत दिवाळी साजरी न करता मदतीची दिवाळी साजरी केली... या वेळी जवळ पास शंभर मिठाईचे बॉक्स व  दीव्यांग मुलांना दोन पोती फटाक्याची मदत करणारा पाहिलाच एन्जॉय ग्रूप पाहिला निस्वार्थ मदत करणारी पहिलीच समाजसेविका ही सौ.अनंतलक्ष्मी कैलासन यांच्या रूपात दिसली तसेच सामाजिक बांधिलकीची दिवाळी साजरी होणे गरजेचे आहे, आपणं दीपावली साजरी करत असताना आपल्या मुळे वृद्ध माता पित्यांची, दिव्यांगांची, गरीब जनतेची दिवाळी कशी साजरी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं वाटतं आहे, आपणं देणं लागतो या समाजाच्या बांधिलकीच पुण्य कसेही मिळू शकते पण कर्मृरूपी आशिर्वाद आपणास फक्त आपण करत असलेल्या प्रामाणिक कार्यामुळेच प्राप्त होते त्यासाठी जाणीव असणे फार गरजेचे असते ही जाणीव समाजातील प्रत्य...

शिरोळ तालुक्यातील विद्यार्थी आमदार यड्रावकर यांच्यासोबत असतील: प्रतीक कुन्नूरे

इमेज
प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे.दानवाड. आमदार यड्रावकर साहेबांचा कार्यकाळ हा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे ज्या अपेक्षेने लोकांनी आमदार साहेबांना निवडून दिले त्याच अपेक्षाची साहेबांनी व्याजासकट परतफेड केलेली आहे प्रत्येक खेडूपाड्यात कोट्यावधीचा निधी देणे हे पहिल्यांदाच घडले आहे महापूर कोरोना राजकीय अस्वस्थ असतानाही लोकांची समस्या सोडवण्यात व विकास कामात कधीच कमी पडले नाही तर जिथे कमी तिथे आम्ही याप्रमाणे साहेबांचे काम चालू होतं असा आमदार मिळाला हे आपल्या सर्वांचे भाग्यच आहे. कोविड नंतर विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत होत नव्हत्या त्या परीक्षा विद्यापीठ अंतर्गत सुरळीत घेण्याचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानी पासून वाचवण्यासाठी आमदार साहेबांनी खूप आम्हाला मदत केली आहे. वेळोवेळी शिक्षण मंत्र्यांनाही याचा पाठपुरावा त्यांनी केली आहे. म्हणून आज आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना पुन्हा एकदा आमदार करण्याचे आपली जबाबदारी आहे.  राष्ट्रवादी पार्टी विधानसभा अध्यक्ष अमर भैया माने, प्रकाश पाटील टाकवडेकर ,यांच्या माध्यमातून आम्ही शिरोळ तालुक्यातून त्यांना नक्कीच लीड देऊ असा विश्वास आम...

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत सतर्कता जागरूकता सप्ताह.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   ‌   सेलू: येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या कार्यालयात सतर्कता जागरूकता सप्ताह सोमवार २८ रोजी बापूसाहेब ठोंबरे (शाखा प्रबंधक) यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले सतर्कता जागरू कता सप्ताह २८ ऑक्टो ते ३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे या निमित्ताने शाखा कार्यालयात शपथ घेण्यात आली नागेश पुराणिक यांनी द्रोपदी मुर्मु (राष्ट्रपति) यांचा संदेश वाचन केले व योगेश जयभाये यांनी प्रवीण के श्रीवास्तव (सेंट्रल विजिलेंस कमीशन)यांचा संदेश वाचन केले या वेळी संस्थेसाठी अखंडते ची प्रतिज्ञा घेतली १) आम्ही नैतिक व्यवसाय पध्दतींना प्रोत्साहन देऊ आणि प्रमाणिक पणा आणि सचोटी ची संस्कृती वाढवू २) आम्ही लाच देणार किंवा स्वीकार णार नाही ३) पारदर्श कता, उत्तरदायित्व आणि निष्पक्षता या वर आधारित चांगल्या कॉर्पोरेट प्रशासना साठी आम्ही वचन बध्द आहोत ४) आम्ही व्यवसाय चालवताना संबंधित कायदे नियम आणि अनुपालन यंत्रणा चे पालन करू ५) आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यां साठी आचार संहिता स्वीका रू ६) आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडण्या...

मनोज जरांगे पाटील समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  परभणी : काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊन सर्वांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच अनुषंगाने आज परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघातून २५ इच्छुकांपैकी पाच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिंतूर विधानसभा मतदार  संघातील दोन इच्छूक  उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पाथरी तील पाच जणांपैकी ज्याला मनोज जरांगे पाटील उमेदवारी देतील, तोच अधिकृत उमेदवार असेल तर जिंतूर मधील दोन  उमेदवारा पैकी एकाला उमेदवारी देतील अन्य इच्छुक आपली उमेदवारी मागे घेतील, असेही त्यांनी सांगितले.परभणी जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे चांगलेच प्रस्थ आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तरुणांवर चांगला प्रभाव आहे, त्यामुळेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट मराठवाड्या सह महाराष्ट्रात जाणवला. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अस्पष्ट भूमिका घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आता निवडणुकीमध्ये सरकारला हिसका दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच म...

परभणी जिल्हातील चारही विधानसभे मध्ये मराठा समाजच किंगमेकर.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. मराठा मतदारांचे  प्रभूत्व जास्त आहे त्यामुळे जरांगे पाटील फॅक्टर ठरविणार कोण आमदार होणार. परभणी : परभणी जिल्ह्यात सर्वच मतदार संघात कुणबी मराठा समाज बहुसंख्येने आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील आकडेवारी लक्षात घेता असे दिसून येत आहे की,जर कोणाला असे वाटत असेल की, मी मराठा समाजाला डावलून आमदार होऊ शकतो तर त्याचा गोड गैरसमज आहे. आज सर्वच मतदारसंघात मराठा समाज जास्त प्रमाणात संख्येने मोठा वर्ग आहे.  मतदाता म्हणून परभणी विधानसभा पाथरी विधानसभा जिंतूर विधानसभा गंगाखेड विधानसभा या चारी विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा कुणबी समाज भरपूर आहे आणि जास्त आहे प्रत्येक मतदारसंघांमध्ये कुणबी मराठा समाजाचा 40% हिस्सा आहे. या समाजाने ठरवलंय की आमदार कोणाला करायचं तोच आमदार होतो कोण्या आमदारा ला पाडायचं का विजयी करायचं हा समाज ठरवतो. परभणी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात कुंनबी मराठा समाजाचे प्राबल्य आहे. पाथरी विधान सभा मतदारसंघात 75000 महिला व पुरुष मतदार आहेत परभणी मतदार 80 हजार महिला पुरुष आहेत. जिंतूर विधान सभा मतदारसंघात 90,000 आ...

मेघना बोर्डीकर यांचे जिंतूर मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.      जिंतूर :दि.28 ऑक्टो. रोजी जिंतूर विधान सभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सोमवारी (दि.28) जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह अन्य हजारो कार्यकर्त्यांसह आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिंतूरातून सकाळी मोठी रॅली काढली. या रॅलीत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांच्यासह गंगाधर बोर्डीकर व अन्य नेते वाहनावर विराजमान होते. मुख्य बाजारपेठेसह चौक व ठिकठिकाणीया रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत सौ. मेघना साकोरे यांनी जिंतूर व सेलू या विधानसभा मतदारसंघाच्या विका साकरीता आपण कटि बध्द आहोत, अशी ग्वाही दिली. समाजा तील विविध वर्गांना न्याय मिळवून देण्याचं काम बोर्डीकर कुटूंबि यांनी सातत्याने केले आहे. या मतदारसंघात पायाभूत सोयी-सुवि धा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीनेही प्रयत्न क...

गणपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

इमेज
शिरोळ/ प्रतिनिधी:  शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांचा प्रचार पूर्ण ताकतीने करणार आहे. तसेच उद्या 29 ऑक्टोबर रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे यांनी केले.      शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ची कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची बैठक शिरोळ येथे पार पडली. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.        रावसाहेब भिलवडे पुढे म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या महायुतीच्या कारभारावर जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐरणीवर असून महागाई, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांच्या सुखदुःखाशी महायुतीचे काही देणे घेणे नाही. केवळ घोषणा करायच्या आणि श्रेयवाद लाटायचे हीच भूमिका घेऊन काम केले जात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही. राज्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ...

कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा गणपतराव पाटील यांना पाठिंबा

इमेज
कुरुंदवाड/प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांना कुरुंदवाड नगरीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व त्यांचे सुपुत्र नगरसेवक अभिजीत पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच विजयासाठी शुभेच्छा दिल्या.     आदरणीय साने गुरुजींच्या विचारांना मानून त्यांच्या विचारधारेवर आतापर्यंत वाटचाल केली आहे. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून माणसाला केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासकार्यात रावसाहेब पाटील यांची साथ बहुमूल्य ठरणार आहे, अशा भावना यावेळी गणपतराव पाटील यांनी व्यक्त केल्या आणि पाठिंब्यावर आभार मानले.  यावेळी देवराज मगदूम, सुनील कांबळे, आशिष मगदूम, साताप्पा बागडी, हसन देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.

अरिहंत शुगर 4 लाख टन ऊसाचे गाळप करणार उत्तम पाटील यांची माहिती जैनापूर येथे सातव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ

इमेज
चिकोडी प्रतिनिधी अमर माने  जैनापूर (ता. चिकोडी) येथील अरिहंत शुगर कारखान्याचे 2024-25 सालात चार लाख टन ऊस गाळपाचे ध्येय असून शेतकऱ्यांच्या सहकार्याने व विश्वासाने हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची हमी आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या जमीनी ओलीताखाली आणण्यासाठी लवकरच योजना राबविण्याचा विचार सुरु आहे. गेली सहा वर्षे केवळ शेतकऱ्यानी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरत या भागातील इतर कारखान्याच्या बरोबरी शेतकऱ्यांना योग्य दर दिला आहे. यंदाही सरकारच्या घोषणेप्रमाणे ऊसाला दर दिला जाणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.  ते जैनापूर येथे अरिहंत साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करून बोलत होते. यावेळी  कारखान्याचे अध्यक्ष अभिनंदन पाटील व मान्यवर प्रमुख उपस्थित होते. श्री. पाटील पुढे म्हणाले की, दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी घालुन दिलेल्या नीती नियम व मार्गदर्शनाखाली मी व माझे बंधू अभिनंदन पाटील विविध कार्यात सहभागी आहोत. त्यामुळे अरिहंत परिवाराचा हळूहळू मोठा विस्तार होत चालला आहे.  यासाठी सर्व सदस्य, शेतकरी, ऊस उत्पादक,...

सैनिक मलिकवाड येथे बाल शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने खास दिवाळीनिमित्त दुर्गवेडे किल्ला स्पर्धा आयोजन.

इमेज
सैनिक मलिकवाड तालुका चिकोडी येथील प्रतिवर्षानुसार बाल शिवाजी तरुण मंडळ यांच्यावतीने खास दिवाळीनिमित्त दुर्गवेडे किल्लास्पर्धा आयोजन करण्यात आले असून. प्रथम क्रमांकासाठी 5001 द्वितीय क्रमांकासाठी 3001तृतीय क्रमांकासाठी 2001 व चतुर्थ क्रमांकासाठी 1001 असे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. नियम व अटी ज्या स्पर्धकांना किल्ल्याचे नाव नोंदणी करायचे असेल तर दिनांक 3/11/2024 या तारखेपर्यंत नाव नोंद करावे.  किल्ल्याची माहिती स्पर्धकाला देता आली पाहिजे किल्ल्यास भोवतालचे वातावरण शिवमय असावे तसेच नैसर्गिक साधने उदाहरण मशाल पणती इत्यादी वापर करावा. पंच कमिटीचा निर्णय अंतिम राहील किल्ल्याचे परीक्षण चार तारखेला राहील किल्ला बांधणी 40 प्रश्नउत्तरे 20 किल्ला माहिती 20 शिवमय वातावरण 10 सामाजिक कार्य 10 एकूण गुण 100. नाव नोंदणी अभय पाटील यांच्याकडे करण्यात येणार आहेत. 9481368318 विशालक्रांती न्यूजसाठी अमर माने मलिकवाड.

शांताबाई शिंदे यांचे निधन.

इमेज
मलिकवाड प्रतिनिधी अमर माने मलिकवाड, २५ ता. येथील रहिवासी शांताबाई लहू शिंदे (वय ८०) यांचे गुरुवारी (ता. २४) निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

मलिकवाडच्या युवकाची दत्तवाडमध्ये आत्महत्या

इमेज
मलिकवाड प्रतिनिधी अमर माने  मलिकवाड, तालुका चिकोडी येथील दत्तवाड- मलिकवाड मार्गावर असणाऱ्या दत्तवाड हद्दीतील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये मलिकवाडच्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली. अभिषेक अनिल आंबी (वय 23 रा. मलिकवाड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावच्या हद्दीत एका शेतातील जुन्या पत्र्याच्या शेडमध्ये अभिषेक आंबी याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. गुरूवारी रात्री याबाबत माहिती मिळताच फोटो त्याची ओळख पटविण्यात आली. अभिषेक कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु त्यानंतर तो परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. गुरूवारी रात्री दत्तवाड हद्दीतील शेडमध्ये त्याचा मृतदेह दोरीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत वैभव आंबी (वय 21) यांने कुरुंदवाड पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार ज्ञानदेव सानप हे करीत आहेत.

अभिनेते श्री विकास वायाळ यांना " उत्कृष्ट अभिनेते" पुरस्कार जाहीर.

इमेज
अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष , दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य  अभिनेते श्री विकास वायाळ यांना ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन शिर्डी यांच्यामार्फत " उत्कृष्ट अभिनेते" पुरस्कार जाहीर झाला आहे, 10 जानेवरी 2025 रोजी  त्यांना ट्रॉफी, सन्मान चिन्ह , मेडल,  सर्टिफिकेट, शाल श्रीफळ, व पुष्पहार देऊन शिर्डी येथे गौरवण्यात येणार आहे

युवकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना सरकार पर्यंत पोचवणार. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे आवाहन

इमेज
आयडियाज् फॉर विकसित महाराष्ट्र' च्या निमित्ताने कोल्हापूर पूर्व दौऱ्यावर असताना अंबप येथील अशोकराव माने इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालय येथे युवकांशी संवाद हा कार्यक्रम पार पडला.  या अभियानाच्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले की, आजच्या काळात युवकांनी आपले मत परखडपणे मांडले पाहिजेत युवकांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार चांगल्या योजना आणण्यासाठी आपले मत नोंद करून त्या प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी सरकार आणि युवक यांच्यातील दुवा म्हणून महाराष्ट्रभर मी प्रवास करत आहे आणि यातूनच विकसित महाराष्ट्र घडेल याचा मला विश्वास वाटतो. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय मीडिया प्रभारी श्री. अमनदीप सिंग, प्रदेश सरचिटणीस श्री. सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. निवेदिता एकबोटे, श्री. अमृत मारणे, श्री. सचिन जायभाये, प्रदेश सचिव श्री. रौनक शेट्टी, तेजस्विनी कदम, गणेश साखरे, विद्यार्थी विभागाचे शिवानंद कानडे, जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने, तालुकाध्यक्ष श्री. विश्वास माने, संस्थाध्यक्ष श्री. विजयसिंह माने, जिल्हा उ...

पुरीगोसावी कुटुंबाचा प्रमुख अन् आधारस्तंभ पाया आणि शान हरपली, जड अंतःकरणाने अखेरचा निरोप

इमेज
प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील  उत्तर कोरेगांव तालुक्यातील करंजखोप गावचे सुपुत्र कै. रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी उर्फ ( तात्या ) यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी सातारा येथे त्यांच्या वास्तव्यांस असणाऱ्या निवासस्थानी गुरुवारी सकाळी अचानक निधंन झाले, तात्यांनी आजपर्यंत आपल्या वैवाहिक जीवनाचा प्रवास, अतिशय संयमी आणि प्रेमळ ठेवला होता. स्वप्नात देखील आम्हांला वाटलं नव्हतं असा प्रसंग येईल म्हणून, आदिमाया भजनी मंडळ आई अंबाबाई तुळजापूर मातेचे जागर गोंधळ करीत होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क देखील सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर मुंबई पर्यंत होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे आज संपूर्ण जनसमुदाय तसेच पुरीगोसावी कुटुंब हे पोरके झाले आहे. तात्यांची आठवण आमच्या कुटुंबालाच नव्हे तर संपर्कांतील जनसमुदायाला कायम भासणार आहे. दोनच दिवसापूर्वी गावची यात्रा होती. कुटुंबामध्ये यात्रा आणि दिवापावलीची धामधूम सुरू होणार होती. या ऐंन सण उत्सवांत पुरीगोसावी कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तात्यांचे नेतृत्व म्हणजे तात्या माझी चुलते होते, पण त्यांनी कधीही चुलतेच्या नात्याप्रमाणे राहिले नाहीत, वडिलांच्या निधना...

देऊळगाव राजा येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची बैठक.प्रतिनिधी- सारंग महाजन

इमेज
देऊळगाव राजा । येथील विश्रामगृहात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती बैठक तालुकाध्यक्ष सुरेश धारे यांच्या मार्गदर्शनात झाली. नूतन सदस्य व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले.  यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश धारे तालुका उपाध्यक्ष कारभारी गायकवाड व समाधान निकाळजे व तालुका सचिव वैभव भालेराव यांनी आपले विचार मांडत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे कार्य आणि पुढील वाटचालीचे नियोजनाची माहिती दिली.

कष्टकरी राजा हरपला :रावसाहेब दादा

इमेज
शेत कसण्यासाठीच आपलं आयुष्य वेचलेला हा शेतकरी.बैलांच्यावर अतूट प्रेम.शेत,गोठा आणि घर याच त्रिकोणात आपला पडका संसार उभा केला.माती आयुष्याची भाकरी देते म्हणून शेतातच रमला.मनोज -अप्पा या कर्त्या दोन मुलांचं बस्तान बसविलं.लेकीच्या संसार सुखाने डोळे सुखावले.अवघाची संसार सुखाचा करीन याच तळमळीने कुटुंबासाठी धडपडला.भावांची चांगली साथ होती. त्यापैकी महावीर भावाकडेच मन मोकळं करायचा. विभक्तपणाच्या भिंती वेगळ्या असल्या तरी नात्यात कधीच अंतर पडू दिलं नाही.जुन्या गावगाड्याच्या वळणावर हळव्या मनात माणुसकी जपत राहिला. कर्तव्यावर निष्ठा ठेवून समोर दिसेल ते काम पूर्ण करणेत स्वताला धन्य समजला.अखेर दि 23/10/2024रोजी देहावर कष्टमय छटा घेऊनच अंतर्धान पावला.उद्या दि 24/10/24रोजी सकाळी 8वा रक्षा विसर्जन... या पुण्यात्म्यास चिरशांती लाभो हीच   भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻

श्रीगोंदा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड व नियुक्तीपत्र वाटप.

इमेज
प्रतिनिधी -सारंग महाजन          22ऑक्टोबर २०२४ रोजी  टायगर पोलीस मित्र संघ (महा.राज्य)वतीने मा. महेश (अण्णा) फडतरे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली  मा.स्वप्नील साळवे यांची श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी तसेच मा.स्वप्नील मांडे यांची श्रीगोंदा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी मा.अक्षयदादा मोगरे (प्रदेश कार्याध्यक्ष) मा.रश्मीताई विर बापट (प्रदेशाध्यक्ष)  मा. प्रदीप सिंह (प्रदेशाध्यक्ष उत्तर भारतीय विभाग) मा. ज्योती ताई चव्हाण ( उपाध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शनाखाली पद नियुक्ती करण्यात आली. उपस्थित मान्यवर मा. सिद्धार्थ भाऊ साळवे, मा.सौरभ साळवे, मा.सूरज मांडे, मा.सागर साळवे, मा.वैभव औटी, मा.संकेत गडदे, मा.अविनाश साळवे, मा.अमर भालेराव, मा.केतन साळवे ह्यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली ह्याबद्दल टायगर पोलीस मित्र संघ च्या वतीने सर्वांचे आभार मानले.

पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेतील फरांडे बाबांची ऐतिहासिक भाकणूक.

इमेज
पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत आज सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सहा लाख भाविकांनी विठ्ठल बिरदेवाच्या नावान चांगभल म्हणत उधळला 50 टन भंडारा केली. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक पार पडली. हेडाम खेळत मंदिराच्या सभागृहात फरांडे बाबांची ऐतिहासिक भाकणूक केली.  या भाकणुकीत फरांडे बाबांनी नऊ दिवसाचे कावड फिरेल चांगला राहील, धारण चढती राहील. महागाई वाढेल, राजकारणात उलथापालत होऊन भगवा फडकेल, भारताचे समान नागरी कायद्याकडे वाटचाल, बळीराजा रोहिणीचा पाऊस मृग नक्षत्राचा पेरा, भारताची महासत्ताकडे वाटचाल, बहिण भावाच्या नात्यातील सलोखा कमी होतील, देवाची सेवा करील त्याची रोगराई कमी होईल, मी स्वतः मेंडका होऊन हातात वेताची काठी घेऊन माझी सेवा करणाऱ्या भक्ताचे मी सदैव संरक्षण करीन अशी भाकणूक फरांडे बाबांनी यांनी केली. भाविकांनी खारीक-खोबरे, लोकरीची प्रचंड प्रमाणात उधळण केली. यावेळी सम्पूर्ण परिसर पिवळा धमक सोनेरी झाला होता.

रांगोळीची कन्या दिव्या कुंभार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

इमेज
कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2024-25. आज डेरवण येथे झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे शिक्षण घेत असलेली रांगोळीची कन्या दिव्या दत्तात्रय कुंभार हिने तालुकास्तर, जिल्हास्तर तसेच विभागीय स्तरावर 400 मीटर रनिंग रिले मध्ये प्रथम क्रमांक मिळवून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तिला मुख्याध्यापक क्रीडा प्रमुख क्रीडा प्रशिक्षक यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे, तिचे टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

चिक्कोडी : निवासी महाविद्यालयाच्या इमारतीवरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू, हिरेकोडी गावात घडली संतापजनक घटना

इमेज
चिकोडी प्रतिनिधी अमर माने चिक्कोडी : मोरारजी निवासी महाविद्यालयाच्या इमारतीवरून पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथे घडली. १७ वर्षीय आफरीन जमादार असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आज परीक्षा असल्याने विद्यार्थी मध्यरात्रीपर्यंत वसतिगृहाच्या इमारतीत बसून अभ्यास करत होते. यावेळी पहिल्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचा संशय आहे, चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे

चिक्कोडी सदलगा मतदारसंघातील भव्य किल्ला (किल्ला) स्पर्धेचे नियोजन

इमेज
एकसंबा प्रतिनिधी अमर माने   चिक्कोडी सदलगा मतदारसंघात कुमारी सोनाक्षी गणेश हुक्केरी आणि अद्विका गणेश हुक्केरी यांनी भव्य वाडा स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. आजच्या तरुणांना शिवाजी महाराजांची देशभक्ती, इतिहास आणि संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने चिक्कोडी सदलगा मतदारसंघात किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील स्पर्धक या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. या किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकास 21000, द्वितीय क्रमांकास 15000, तृतीय क्रमांकास 11000, चौथ्या क्रमांकास 7000 व पाचव्या क्रमांकास 5000 रूपये बक्षीस देण्यात येणार आहे.  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही शिवराज हुक्केरी मोबाईल क्रमांक 8310383047 वर संपर्क साधून नाव नोंदणी करू शकता.

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जयसिंगपूर येथील सराईत महिला गुन्हेगाराकडून २७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त

इमेज
प्रतिनिधी:रियाज जैनापुरे इचलकरंजी वडगाव बाजार समिती येथील महिलेच्या गळ्यातील धनहार चोरीला गेला होता याची माहिती कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार तपास केले असता जयसिंगपूर येथील सराईत महिला गुन्हेगार ज्योती पाटील राहणार नांदणी जयसिंगपूर हिने हा हार चोरल्याची माहिती मिळाली असता कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने माहिती काढून ही महिला कोल्हापूर येथील ताराराणी चौकात हा हार विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून त्या महिलेला अटक केली असता तिच्याकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली तसेच तिच्याकडील धनहार जप्त करण्यात आला ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक मा.महिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, धनश्री पाटील, शुभम सपकाळ, सुशांत पाटील,कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने, महेश पाटील, आणि महेश खोत यांनी ही कारवाई केली

बोरगाव सिद्धेश्वर दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी बोनस वाटप. चेअरमन आण्णासाहेब हवले

इमेज
म्हैस दुधास 5 टक्के तर गायीस  3 टक्के विक्रमी बोनस . बोरगांव/प्रतिनीधी. बोरगाव येथील श्री सिध्देश्वर दूध उत्पादक सहकारी संघाकडून संघाच्या सभासदना म्हैस दुधास शेकडा 5 तर गायीस 3 टक्के प्रमाणे उच्चांकी विक्रमी बोनस वितरण करण्यात येत असल्याचे दूध उत्पादक संघाचे संस्थापक चेअरमन आण्णासाहेब हवले यांनी सांगितले. श्री सिध्देश्वर दूध डेअरीच्या 9 व्या बोनस वितरण समारंभाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पाटील हे होते. शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या उत्पादित दुधाला योग्य फॅट व रास्त भाव मिळवा,शिवाय गवळी व खासगी दूध विक्रेत्यांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांंची होणारी फसवणूक थांबावी,यासाठी आपण दूध डेअरीची स्थापना केली आहे.याचा शेतकऱ्यानं बरोबर महिला वर्गाला नक्कीच फायदा होईल असे ठाम मत प्रतिपादन संघाचे संस्थापक चेअरमन व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सन्माननीय आण्णासाहेब हवले यांनी व्यक्त केले. तर दुध हा शेतकऱ्यांचा दुय्यम व्यवसाय असल्याने आपण दूध संघा बरोबर सभासंदच्या हिताला अधिक महत्व देत सर्वाधिक बोनस देण्याची परंपरा कायम ठेवली असून पंचक्रोशीत यंदा सर्वाधिक बोनस वितरण केले असल्याचेही स...

कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी, मुंबई, विद्यार्थी गुणगौरव समारंभ, (मुंबई विभाग).

इमेज
मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर   उपरोक्त संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी ७०%, बारावी ६५% तसेच पदवी, पदविका, उच्च शिक्षण परिक्षा ६०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या फक्त भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, स्थळ : कित्ते भंडारी सभागृह, शिवसेना भवन जवळ, दादर, ४०००२८, येथे लवकरच आयोजित करण्यांत येणार आहे.   इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. (शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४) वि.सू. प्रवेश अर्जासोबत शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ च्या मूळ गुणपत्रिकेची व खालील पैकी भंडारी जातीचा उल्लेख असलेल्या "एका" कागद पत्राची स्वसाक्षांकित केलेली प्रत जोडणे आवश्यक आहे. १) वडिलांचा किंवा विद्यार्थ्याचा * भंडारी * जातीचा दाखला २) वडिलांचा किंवा विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर भंडारी ज्ञातीची नोंद असणे आवश्यक. ३) भंडारी मंडळाने दिलेले जात प्रमाणपत्र अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४, वेळ : स...

बोरगाव येथील रवीवार आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य,! पूर्ववत जागेवरच बाजार भरावा, शहरवासीयांची मागणी. नगरसेवक शरदराव जंगटे.

इमेज
बोरगांव/ प्रतिनिधी.          बोरगाव येथील रवीवार आठवडी बाजार हा पूर्ववत जागेवरून शहराच्या बाहेरील बाजूस नव्याने भरविला जात आहे.सदर बाजार ठिकाणाच्या मार्गावर दोन्ही बाजूने घाणीचे साम्राज्य विखुरले आहे.शिवाय या बाजाराचे ठिकाण हे गावभागापासून दूर अंतरावर असल्याने विशेषतः महिला वर्गांला याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे सदर बाजाराचे ठिकाण बदलून पुन्हा शहराच्या मध्यभागी पूर्ववत जागेवरच भरावा अशी मागणी नगरसेवक शरद जंगटे यांनी केली आहे. बोरगाव येथे आठवड्यात रविवार,बुधवार असे दोन बाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरले जातात.शहराबरोबर परिसरातील गावाच्या लोकांचा वावर या बाजारपेठेत अधिक प्रमाणात असल्याने परिणामी या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असल्याचे पहावयास मिळते. येथील रविवारी आठवडी बाजार हा शहराच्या मध्यभागी प्रमुख रस्त्यावर एपीएमसी मार्केट समोर असलेल्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून भरवला जात  असायचा. पण काही दिवसांपासून हा आठवडी बाजार कोणतेही कारण नसताना या-ना  त्या कारणावरून शहराच्या बाहेरील बाजूस येणाऱ्या व स्मशानभूमी पासून जवळच असलेल्या जागेवर भरवला...

उत्तराखंड येथे झालेल्या CBSC राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रतिक्षा हवालदार रौप्य पदक

इमेज
रायबाग: शहरातील महावीर रेसिडेन्शिअल इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आणि रायबाग तायक्वांदो सेंटर (RTC) ची विद्यार्थिनी प्रतीक्षा सुरेश हवालदार हिने नुकत्याच बाजपूर, उत्तराखंड येथे झालेल्या CBSC राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत रौप्य पदक जिंकले वैभव आणले.  या विद्यार्थ्याला प्रशिक्षक जयदीप देसाई यांनी प्रशिक्षण दिले.  या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन व शहरातील नागरिकांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

सेलु येथे पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळा संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा सेलू येथे कार्यक्रम संपन्न.   सेलू : दि. 19 ऑक्टो. शनिवार रोजी सेलू शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्या ध्यापक किरण बोराडे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पौळ  कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक कला शिक्षक पांडुरंग पाटणकर, सहशिक्षक विजय सोंजे आदी उपस्थित होते. प्रास्ता विक  मंजुषा जगदाळे यांनी केले.कला शिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी उपस्थित 100 विद्यार्थ्यांना पर्याव रणाचे महत्त्व तसेच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कागदा पासून विविध प्रकारचे छोटे छोटे आकाश कंदील कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. बालकांनी  कृती युक्त सहभाग नोंदवला आभार मुख्याध्यापि का सालेहा परवीन यांनी मानलेकार्यशाळा यशस्वीतेसाठी सह शिक्षिका अविद्या गाडे, रेशमा बेगम मंजूर, सय्यद रहिल्याबाजी, कमल काळे यांनी परिश्रम घेतले.

विशालक्रांती न्युज वृत्ताची दखल, खोतवाडीतील नित्कृष्ट दर्जाहिन रस्त्याचे दुबार काॅंक्रीटिकरण, बांधकाम अभियंत्याचे कौतूक.

इमेज
खोतवाडी - हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी माने मळा येथे खास. धैर्यशील माने यांचे फंडातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रस्त्याचे काॅंक्रीटीकरण करण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम नित्कृष्ठ झाल्यामुळे एक महिन्यातच रस्त्याची खडी उचकटून रस्त्याला भेगा पडल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. असे वृत्त विशालक्रांती न्युज वर प्रसारित करण्यात आली होती, विशालक्रांतीच्या वृत्ताची दखल घेऊन बांधकाम अभियंता आकाश गिरी यांनी प्रत्यक्ष रस्ते कामाची  पाहणी केली. यावेळी सदर रस्ता पुन्हा करून देण्याचे आश्वासन दिले होते.          सदर रस्ता काॅंन्ट्रक्टरकडून दुबार काॅंक्रीटीकरण करण्यास भाग पाडले. त्यामुळे बांधकाम अभियंता आकाश गिरी यांचे कौतूक होत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

बोरगाव येथे महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

इमेज
बोरगांव/ प्रतिनिधी. रामायणकार व आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती बोरगांव येथील समस्त वाल्मिकी समाजाच्या    वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, प्रारंभी बोरगांव येथील युवा नेते उत्तम पाटील,माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले,हाल सिद्ध नाथ साखर कारखान्याचे संचालक श्री शरद जंगठे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतीमेस पुष्प अर्पण करून श्रीपळ वाढविण्यात आले                  यावेळी उपस्थित मान्यवरांचा समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम दरम्यान बोलतांना    सहकार रत्न युवा नेते  उत्तम पाटील म्हणाले की  आज अखंड मानव जातीला महर्षी वाल्मिकी ऋषींच्या विचारांची प्रेरणा घेणे गरजेचे आहे, बंधूभाव कसा असवा हे ऋषिने आपल्या रामायण ग्रंथातून सांगितले आहेत, यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब हावले  आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की भारत ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते ,  संत अथवा महापुरुष यांचे विचार ...

जांबोटीनजीक झालेल्या अपघातात विद्यार्थी ठार

इमेज
कंटेनर वाहन व दुचाकी यांच्यात धडक झाल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळ घडली.       निखिल बाबागौडा पाटील (१९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो चिक्कोडी तालूक्यातील मांजरी गावचा रहिवासी असून बेळगाव येथील जीआयटी येथील महाविद्यालयात पीयूसी फर्स्ट इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मूडलगी येथील निखिल रमेश बेलकूडे हा दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. आज वाल्मिकी जयंतीनिमित्त कॉलेजला सुट्टी असल्याने हे दोन्ही विद्यार्थी जांबोटीजवळ फिरण्यासाठी  दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुशार विद्यर्थ्याचा अपघातात निधन झाल्याचे समजताच मांजरी गावाला धक्का बसला.निखीलच्या अचानक जाण्याने पाटील कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळल्याने सांत्वन करण्यासाठी आलेल्या़ंचे डोळे पाणावत होते.

हातकलंगले विधानसभा मतदारसंघातून तिरंगी लढत निश्चित डॉक्टर सुजित मिणचेकर लढण्यावर ठाम

इमेज
हुपरी प्रतिनिधी - 278 हातकलंगले विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे अधोरेखित झाली असून या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे व डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्यामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असून या महाविकास आघाडी मधून आमदार राजूबाबा आवळे यांना जवळजवळ उमेदवारी निश्चित मानली जात असून डॉक्टर सुजित मिणचेकर यांची काय भूमिका असणार यावर सर्वांचे लक्ष लागले असून  महायुतीतून दलितमित्र अशोकराव माने जनसुराज्य कडून जवळजवळ निश्चित असून  या दोन्ही महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार जवळपास ठरले असल्याने राहीला प्रश्न  डॉक्टर सुजित मिणचेकर यांचा ते आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवत असून   त्यांच्या मुंबईत बैठकांचा धडाका सुरू आहे  कारण 35 दिवस राहिले असून यामध्ये प्रचार यंत्रणा राबवणे व उमेदवारांनी सर्व तालुक्यांमध्ये गावांमध्ये पोहोचणे हे महत्त्वाचे असल्याने  तसा डॉक्टर सुजित मिणचेकर यांचा दहा वर्षाचा अनुभव पाहता ते तळागाळात पोहोचले असून  अशोकराव माने हे देखील त्यांच्या बरोबरीने तळागाळापर्यंत पोहोचले आहेत  परं...

अखेर बांधकाम कामगारांच्या पदरी निराशाच बोनसची नुसती घोषणा : कॉ. आनंदा गुरव.

इमेज
इचललकरंजी - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना दिवाळी दसऱ्या करिता पाच हजार रुपये सानूग्रह अनुदान देण्याची घोषणा कामगार मंत्री मा. सुरेश खाडे यांनी केली होती मात्र या घोषणा हवेतच विरघळली आहे याचा जाहीर  निषेध व आश्चर्य व्यक्त महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कॉ.  आनंदा गुरव यांनी केले         . या कल्याणकारी मंडळाकडे विस हजार कोटी शील्लक आहेत, विविध शैक्षणिक, सामाजीक, आर्थिक लाभा पेक्षा गृहोपयोगी वस्तू (भांडी) अत्यावश्यक वस्तु संच ( पेटी ) यावर सर्वात ज्यादा खर्च केला जातो त्या मागील गोड बंगाल काय हा ही प्रश्न उभा राहतो मंत्री महोदयांनी घोषणाच्या अनुषंगाने कोणताही आदेश व परिपत्रक या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने अद्याप काढले नाही अधिकारी यांना विचारणा केली असता  माहीत नसलेचे सांगण्यात येते‌.  ही नोंदीत बांधकाम कामगारांची क्रुर चेष्टाच केलेले दिसते. मंडळाकडे वीस हजार कोटी शिल्लक असताना बांधकाम कामगारांना अडचनीच्या वेळेला पैसे देणे का टाळले अनेक...

नंदुरबार पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराची मनमानी विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे प्रशासनाला निवेदन

इमेज
नंदुरबार-नगर पालिका प्रशासनाने नंदुरबार नगर परिषद हद्दीत जाहिरात बॅनर लावण्यासाठी खाजगी एजन्सीद्वारे कमर्शियल अथवा व्यक्तीगत प्रसिद्धीकरीता लावण्यात येणारे बॅनर चौकाचौकात लावण्यात येत आहेत. याबाबत सर्वसामान्य नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व तक्रारी वाढत आहेत. सर्वसामान्य नागरीकांचे शंकांचे निरसन पालिका प्रशासनाने करावे. प्रशासनाने निश्‍चित केलेली खाजगी एजन्सीचे ठेकेदार मनमानी करुन विना आरक्षित जागेवर जागोजागी रस्त्यांवर जाहिरात बॅनर लावून सर्वसामान्य नागरीकांची लुट चालविलेली आहे, अशा सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारी असल्याने मुद्देनिहाय विविध मागण्यांचा खुलासा मिळावा, अन्यथा विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्यावतीने पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात असा इशारा नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्यावतीने पालिका प्रशासनास दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आदिवासी बहुल नगरपालिकेत खाजगी ठेकेदार नेमतांना प्रशासनाने कोणती विहित कार्यपद्धती अवलंबविण्यात आली होती. या निर्...

प्रा.(डॉ). झांबरे व डॉ. वाटेगांवकर जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत**अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेचे सर्वेक्षण

इमेज
वाई,  अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे व सहायक प्राध्यापक डॉ. संदीप वाटेगांवकर यांना जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत अग्रस्थान मिळाले आहे. स्कॉलर जीपीएस या संस्थेने आजीवन व मागील ५ वर्षातील जागतिक संशोधकांची यादी प्रसिद्ध केली, यामध्ये जगभरातील नामवंत संशोधकांचा समावेश आहे. डॉ. झांबरे व डॉ.वाटेगांवकर यांच्या नावांच्या समावेशाने किसन वीर महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे.  प्रा.(डॉ.) झांबरे यांना शिक्षण व संशोधन क्षेत्रात ३ दशकाहून अधिक अनुभव असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये २० हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. रसायनशास्त्र विषयातील १०० हुन अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. समाजातील विविध प्रश्न घेऊन विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी ते नेहमीच कार्यरत असतात. ग्रामीण भागामध्ये विज्ञानाचा प्रचार व प्रसा...

प्रेषित मुहम्मद(स.अ.) यांच्या जिवनावरील निबंध स्पर्धेस प्रतिसाद.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. अल फलाह एज्युकेशन & वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम.   सेलू : मिलादुन्नबी च्या निमित्ताने प्रेषित मुहम्मद ( स‌. अ. ) यांच्या जिवनावरील विविध पैलूंवर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन अल फलाह एज्युकेशन & वेल्फेअर सोसायटीच्या वतीने वर्ग ५ ते ७ व वर्ग ८ ते १० या दोन गटात ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते‌.या स्पर्धेत वेगवेगळ्या शाळेतून २६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत वर्ग ५ ते ७ या गटात प्रथम- पठाण आदिना फीरदोस (डाॅ.  झाकेर हुसैन प्राथमिक शाळा), द्वितिय- शेख शिफा फातिमा ( यासेर ऊर्दू प्राथमिक शाळा ), तृतीय - हुजैफ खान ( शैलजा ऊर्दू प्राथमिक शाळा ) , तृतीय - आयेशा सिद्दिखा ( डाॅ. झाकीर हुसेन ऊर्दू प्राथमिक शाळा ), उत्तेजनार्थ रहेमीन अरमिन केंद्रीय प्राथमिक ऊर्दू शाळा ) हे विद्यार्थी तर माध्यमिक गटात प्रथम मिसबाह बेगम ( डाॅ. झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल ),  द्वितीय आदिबा वाहिनी  ( झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल ) , तृतिय-  जरका इरम ( झाकीर हुसेन ऊर्दू हायस्कूल ) उत्तेजनार्थ - आलिय...

कर्तव्य फौडेंशनने सामाजिक भान जपले : सौ भारती कोळी राजाराम विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण, मोफत गणवेश वाटप

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी त्यांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक संस्था मदतीचा हात पुढे करीत असतात. सामाजिक भान जपत येथील कर्तव्य फौडेंशनने राजाराम विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची काळजी घेतली आहे. असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी केले.  येथील राजाराम विद्यालयात कर्तव्य फौडेंशनच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले या कॅमेराचा लोकार्पण सोहळा, व शासनाकडून आलेल्या गणवेशाचे वाटप, माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती, आणी वाचन प्रेरणादिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ भारती कोळी या बोलत होत्या शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख अण्णा मुंडे या समारंभाचे अध्यक्षस्थानी होते  सुरुवातीला प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांचा व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मारुती जाधव यांची  विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्य...

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी

इमेज
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात डॉ.ए.पी.जी.अब्दुल कला यांच्या प्रतिमा पुजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.यानंतर श्री.सी.बी.समाजे सर यांनी आपल्या मनोगतातून डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांच्या जीवना विषयी आपल्या मनोगतातून माहिती सांगितली.तसेच पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांच्या कार्याची,त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची माहिती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.तसेच वाचन प्रेरणा दिना निमित्त वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणुन शालेय परिसरातील पाच कुटुंबामध्ये विद्यालयाच्या वतीने वृत्तपत्राचे वाटप करण्यात आले.तसेच विद्यालयामध्ये  डॉ.ए.पी.जी.अब्दुल कलाम यांची वेशभूषा आयान नदाफ इयत्ता 9वी या विद्यार्थ्याने सादर केली.           या प्रसंगी सर्व शिक्षक- शिक्षिका,विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षकेत्त...

श्रीराम कथेसाठी सेलू शहर सज्ज.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराजांच्या वाणीतून उद्या पासून कथा प्रारंभ ; भव्य शोभायात्रा. सेलू : दि. 14 अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत परमपूज्यस्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या 'हनुमानगढ' परिसरात मंगळवार पासून (१५ ऑक्टोबर) श्रीराम कथेला प्रारंभ होत आहे. कथेच्या निमित्ताने शहरात जागोजागी कथेच्या बॅनर, होर्डींंगने सर्वांचे लक्ष वेधले असून कथेसाठी सेलू शहर सज्ज झाले आहे. बुधवार, २३ ऑक्टोबरपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्रीराम कथा (मराठीतून) होईल. यानिमित्ताने मंगळवारी सकाळी ८ वाजता श्री केशवराज बाबासाहेब मंदीर ते श्री बालाजी मंदीरा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. क्रांती चौक, धनलक्ष्मी मंगल कार्यालय,सारंगीगल्ली हनुमान मंदिर, गंगाधर स्वामी मठ, मारवाडी गल्ली चौक मार्गाने श्री बालाजी मंदिरा मध्ये शोभा यात्रेची सांगता होणार आहे. शोभा यात्रेत श्रीरामायणासह विविध ग्रंथ दिंडी, बँड पथक, धर्म ध्वज,अश्व,...

शिरोळ दत्तचे १६ लाख मेट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ट : अध्यक्ष रघुनाथ पाटील

इमेज
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात 16 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस दत्त कारखान्याला घालावा, असे आवाहन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी 53 वा गळीत हंगाम बॉयलर प्रदीपन प्रसंगी केले. शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपण्याचे काम श्री दत्त कारखान्याने केले असून सर्वांना पुढे घेऊन जाण्याची दृष्टी ठेवली आहे. लवकरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संस्था स्थापन करून मार्केटिंग आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली. प्रारंभी कारखाना चेअरमन रघुनाथ पाटील यांनी सपत्निक पूजा केली. तसेच मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी आणि बॉयलर प्रदीपन करण्यात आले. गणपतराव पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच सेंद्रिय कर्ब वाढवून जमीन शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. पूरबुड क्षेत्रात उसापेक्षा भाजीपाल्याची दोन पिके घेतल्यास उसाइतके उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात. या दृष्टीने कारखाना सध्या काम करीत आहे. भाजीपाला उत्पादकांनी एकत्र येऊन पू...

सौ. सुनिता प्रसाद सोनवणे यांना राज्यस्तरीय योग नारिरत्न पुरस्कार जाहीर

इमेज
प्रतिनिधी सारंग महाजन धुळे: साईकला बहुउद्देशीय संस्था धुळे अंतर्गत शिव योग केंद्राच्या संस्थापिका आणि शिव एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या सचिव सौ. सुनिता प्रसाद सोनवणे यांना कै. श्री. माणिकराव एज्युकेशन फाउंडेशन, कोल्हापूर यांच्याकडून राज्यस्तरीय योग नारिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या सन्मानाने त्यांना योग क्षेत्रात अधिक उभारी मिळेल आणि त्यांच्या कामाची दखल घेतली गेल्याने निश्चितच प्रेरणा मिळेल. सौ. सुनिता सोनवणे यांनी गेली तीन वर्षांपासून योगाचा अभ्यास सुरू केला असून त्यांनी साईकला बहुउद्देशीय संस्था अंतर्गत शिव योग केंद्राची स्थापना करून अनेक योग शिबिरे यशस्वीरीत्या आयोजित केली आहेत.तसेच त्यांनी आयुष मंत्रालय प्रमाणित या ठिकाणी योग पदवी संपादित केली आहे. तसेच नुकतेच त्यांना 21 जून 2024 रोजी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ यांच्याकडून देखील सन्मानित करण्यात आले. नियमित योग वर्गात ते असंख्य साधकांना मार्गदर्शन करत आहेत आणि योगाच्या प्रचार-प्रसारासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. सौ. सुनिता यांनी या पुरस्काराचा सन्मान घेतला असताना आपल्या भावनाही व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “या सर...

यमगर्णी जवळील सहारा हॉटेल नजीक ४० वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून निघृण खून

इमेज
निपाणी प्रतिनिधी  निपाणी नजीक असलेल्या यमगर्णी हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत लागून असलेल्या हॉटेल सहारा हायवे नजिक एकाचा निघृण खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. संतोष विश्वनाथ चव्हाण (वय ४०, रा. यमगर्णी) असे खून झालेल्याचे नाव आहे. दरम्यान संशयीत आरोपी सौरभ वसंत कोरवी (वय २६ रा. यमगर्णी) याला बसवेश्वर चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे. विशेष म्हणजे निपाणी शहरात गेल्या आठवड्यात बुधवार ऑक्टोबर 2 रोजी युवकाचा खून झाल्यानंतर लागलीच ही घटना नवव्या दिवशी घडल्याने पोलीस यंत्रनेची झोप उडाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत संतोष चव्हाण हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. तर संशयित आरोपी सौरभ कोरवी हा खाजगी नोकरी करीत होता. दरम्यान सौरभ याने अनेक लोकांची फसवणूक चालवली होती. त्याच्या फसवणुकीला बळी पडू नका असे संतोष चव्हाण यांनी काही जणांना सांगितल्याचा राग मनात धरुन सौरभ याने संतोष त्याला चाकूने भोसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर मयत व आरोपी आणि त्यांच्यासह त्यांचे मित्र मंडळी सह...