पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सांगली:नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क रहाण्याचे आवाहन

इमेज
सांगली दि. 30  सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने, पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये अंदाजे 1 त 2 फुट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आज दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी 38फूट 6 इंच इतकी आहे. आज कोयना धरणामधून 42 हजार 100, धोम धरणातून 453, कन्हेर धरणातून 4 हजार 622, उरमोडी धरणातून 500, तारळी धरणातून 3 हजार 526 व वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती ग्रामपंचायतीच्या आवारात शिरले कृष्णा नदीच्या पुराचे पाणी.

इमेज
रायबाग : तालुक्यातील बावन सौंदत्ती, दिग्गेवाडी, जलालपूर, भिरडी, चिंचाली या गावांतील शेतात मंगळवारी पाणी शिरल्याने महाराष्ट्र राज्यातील जलाशयातून कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे वाहून गेली आहेत.        तालुक्यातील बावन सौंदत्ती ग्रामपंचायत कार्यालय परिसरात कृष्णा नदीचे पाणी शिरल्याने ग्राम पंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे, उपाध्यक्ष आझाद ताशीवाले सदस्य अनिल हंजे, पीडीओ संगमेश न्यामगौडा यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पंचायत साहित्य व फाइल्स सुरक्षित स्थळी हलविल्या.     कृष्णा नदीच्या पाणीपातळीत क्षणोक्षणी वाढ होत असून नदीकाठावरील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.  तालुका प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे.  याशिवाय, मोठ्या प्रमाणात काळजी केंद्रे उघडली पाहिजेत, जिथे पीडितांना सर्व आवश्यक सुविधा पुरविल्या जाव्यात. 

विशेष बातमी - रायबाग-अंकली रस्त्यावर खोल खड्डे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.

इमेज
रायबाग : शहराच्या हद्दीतील रायबाग-अंकली रस्त्याच्या मधोमध खोल खड्डा तयार झाला असून, त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे.   हा रस्ता रायबाग शहरापासून चिक्कोडी व मिरजेकडे जाणारा मुख्य रस्ता आहे.  या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात.  या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना अत्यंत काळजी घ्यावी लागते.  अगदी वेगवान रायडर्सनाही संवेदना हरवून हातपाय मोडण्याची हमी दिली जाते.  सध्या पावसाळा असल्याने हा  (खड्डा) रात्रीच्या वेळी पाण्याने भरलेला असतो, त्यामुळे वाहनधारकांना रस्ता दिसत नसल्याने खाली पडून हातपाय तुटतात.   गंमत म्हणजे या रस्त्यावरून अधिकारी व लोकप्रतिनिधी नियमित ये-जा करतात, मात्र ते त्यांच्या ध्यानात येत नाही.   मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनधारक व प्रवाशांची सोय करावी, असा जनतेचा आग्रह आहे.  विधान:   आर.बी.मानवद्दार, AEE, सार्वजनिक बांधकाम विभाग, रायबाग: "आम्ही रायबाग-अंकली रस्त्यावरील खड्डे 2-3 दिवसात खडी भरून तात्पुरते दु...

कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 6 लाख 62 हजार 930 बहिंणीकडून नोंदणी

इमेज
कोल्हापूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पात्र महिलांना योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन कोल्हापूर, दि.30 : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा याकरीता जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत 6 लाख 62 हजार 930 महिलांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या ऑनलाईन अर्जांपैकी 4 लाख 49 हजार 738 महिलांनी आपले अर्ज कार्यालयात जमा केले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीमुळे तसेच 3 हजार 714 प्रशिक्षण देण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांमार्फत शहरी व ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्याप सुरु आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेत पात्र महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेल्या नियोजनामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय...

नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी दामोदर सुतार यांची फेरनिवड

इमेज
शिरोळ/प्रतिनिधी:      सांगली येथील नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी हेरवाड (ता. शिरोळ) येथील दामोदर सुतार गुरुजी यांची फेरनिवड करण्यात आली. खासदार विशाल दादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.        नवभारत शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शांतिनिकेतन लोक विद्यापीठातील स्वातंत्र्य सैनिक धोंडीराम माळी रेड कॉर्पेट सभागृहात झाली. यावेळी वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी विशाल दादा पाटील होते.         दामोदर सुतार यांनी अनेक सहकारी, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रदीर्घ काळापासून काम केले आहे. प्राथमिक शिक्षक बँकेचे 22 वर्षे माजी चेअरमन, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त भांडारचे विद्यमान चेअरमन तसेच विविध संस्थांमध्ये अनेक पदावर संचालक, मार्गदर्शक म्हणून सध्या काम पाहतात. नवभारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची फेरनिवड होऊन त्यांचा सत्कार यावेळी खासदार विशाल दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.      सभेचे प्रास्तावि...

नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनची पूरग्रस्तांना मायेची उब.नानीबाई चिखली, बानगे, कुरुकली येथील पूरग्रस्तांना ब्लॅंकेटचे वाटप.....

इमेज
कागल, दि. ३०: (डॉ. सचिन  पोवार प्रतिनिधी ) नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनने पूरग्रस्तांना मायेची ऊब दिली आहे. वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामध्ये स्थलांतरित झालेल्या नानीबाई चिखली, बानगे, कुरुकली येथील पूरग्रस्तांना नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.                वेदगंगेच्या या महापुरामुळे या तिन्ही गावातील अनेक महापूरग्रस्तांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. या सर्वांचे संसार पाण्याखाली बुडून भिजून गेले होते. यावेळी नानीबाई चिखली येथील-१५०,  कुरुकली येथील-७१,  व बानगे येथील-६६, अशा एकूण २८७ महापूरग्रस्तांना ब्लॅंकेट्सचे वाटप झाले. यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नानीबाई चिखलीचे बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सदाशिव तुकान, बानगेचे राजू पाटील, धनाजी पाटील, संतराम पाटील,  कुरुकलीचे महेश पाटील, प्रकाश दाभोळे, माजी उपनगराध्यक्ष प्रविण काळबर, अर्जुन नाईक आदी प्रमुख उपस्थित होते. ........

शिरोळ तालुका खाजगी शिक्षक सेवकांची सह.पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

इमेज
जयसिंगपूर : प्रतिनिधी शासनाकडून शिक्षण संस्थेला देण्यात येणार्‍या वेतनेत्तर अनुदानात वाढ व्हावी. शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावे, या प्रलंबित प्रश्नासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. शिरोळ तालुका खाजगी शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने सभासदांना आर्थिक पाठबळ दिले. त्याप्रमाणे त्यांच्या मुलांना आपल्या भागात रोजगार व्यापार उपलब्ध व्हावा, यासाठी ही सामाजिक संकल्पना हाती घेऊन भविष्यात काम करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले., शिरोळ तालुका खाजगी शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेचा रौेप्य महोत्सवी वर्ष त्यानिमित्ताने सेवानिवृत्ती शिक्षक गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अशा संयुक्त कार्यक्रमात आमदार यड्रावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर होते. महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, पतसंस्थेचे संस्थापक बादशाह जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील सोनाबाई इंगळे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बादशाह जमादार यांनी खाजगी शिक्षक सेवक वंचित घटका...

मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्व. गजाननबापू पाटील यांची पुण्यतिथी संपन्न

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गजाननराव (बापू) पाटील यांची चौथी पुण्यातिथी  त्याचबरोबर विद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी कै. उदय वसंतराव ढोकळे यांची प्रथम पुण्यतिथी संपन्न झाली . यावेळी  संस्थेचे अध्यक्ष डॉ जगदीश पाटील सचिव मेजर के. एम् भोसले, खजिनदार कृष्णात पाटील, संचालक सुरेश पाटील,भगवान कांबळे, संग्रामसिंह देसाई, अणुसया चव्हाण ,अमोल चव्हाण,अमित जाधव,अरुण पोटे,मनोज पाटील,शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. गजाननराव पाटील (बापू ) व कै. उदय वसंतराव ढोकळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी केले.  मेजर के. एम् भोसले  यांनी आपल्या मनोगतातून कै. गजाननराव पाटील (बापू) यांच्या कार्याची ओळख करून दिली .  संस्थेचे अध्यक्ष जगदीश पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या अध्...

नूतन कन्या प्रशालेत तालुकास्तरीय कथा कथन स्पर्धा संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा सेलू, स्वर्गीय सौ.दुर्गाताई दत्तात्रय कुलकर्णी आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कथा कथन स्पर्धा नूतन कन्या प्रशालेत संपन्न झाली.दि.29 जुलै 2024 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, प्रशालेचे उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल,स्पर्धेचे परीक्षक एस.डी.पाटील,प्रमोद देशमुख, प्रशालेचे सह शिक्षक भालचंद्र गांजापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात कै.दुर्गाताई कुलकर्णी आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा प्राचार्य द.रा.कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शना द्वारे पार पडली.खरा तो एकची धर्म ही प्रार्थना रेणुका अंबेकर यांनी म्हटली.कार्यक्रमा चे प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे यांनी केले. तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत सेलू तालुक्यातील 18 स्पर्धकांनी सहभाग नोंदवत अनेक संस्कारक्षम, बोधपर बोध कथा सांग...

शिवाई संघटना कोल्हापूर यांचे कडून पूर बाधितांना कपडे वाटप

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे कोल्हापूर मध्ये जी पूर परिस्थीती निर्माण झाली आहे अश्या लोकांची घरे पुरामध्ये गेली आहेत त्यामुळे त्यांचे स्थलांतर चित्रदुर्ग मठमध्ये करण्यात आले आहे.पूर परिस्थितीची पाहणी करून शिवाई संघटने तर्फे लहान बाळांचे कपडे व खाऊ वाटप करण्यात आले.या वेळी  सुनिल कानुरकर,बाजीराव कांबळे,सुनिल नेसरीकर,उदय नागवडेकर,महादेव सुतार, स्वरूपा खुरंदळे,सविता कानुरकर,मनीषा खोत,सुप्रिया गोरे,सागर गुरव,विकास कांबळे, ऋषिकेश पोवार,आदी  उपस्थित होते.सामाजिक जबाबदारी म्हणून आपणा सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे कुणालाही,कुठलीही अडचण असेल तर शिवाई संघटना कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील या वेळी करण्यात आले.

प्रा.पुनम चौगुले यांनी प्रिस्ट विश्वविद्यालय तमिळनाडूच्या फार्मसी विभागातून पीएचडी पदवी संपादन केली

इमेज
अकिवाट प्रतिनिधी /      अकिवाट येथील बाळासाहेब पारीसा कोथळी यांची जेष्ठ कन्या तर इचलकरंजी येथील  बाळासाहेब चौगुले यांच्या सुनबाई प्रा.पूनम निलेश चौगुले या फार्मसी क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन करुन व्हेरीकोज व्हेन्स या रोगावर औषध निर्माण केली आहे. युजीसी मान्यता प्राप्त प्रिस्ट विश्वविद्यालय तंजावर, तामिळनाडू,फार्मसी विभागातुन डॉक्टरेट  ही पदवी मिळवली आहे.माध्यमिक शिक्षण श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट तर पदवीधर शिक्षण के एल ई कॉलेज व राजीव गांधी युनिव्हर्सिटी मध्ये झाले आहे.सद्या प्रोफेसर व वनस्पती औषधनिर्माण शास्त्र विभाग प्रमुख म्हणून अशोकराव माने काॅलेज पेठ वडगाव याठिकाणी अध्यापनाचे काम करत आहेत. या पीएचडी पदवी करीता डॉ.कैलास कौमारवेळू, डॉ.नागाप्पना, डॉ.एम.बी.पाटील, डॉ.एस एस पाटील, डॉ. डि. आर. जडगे, डॉ. एस, व्ही. पाटील, डॉ. ए. पी.गडद, डॉ. आर. एस. बगली यांचे मार्गदर्शन लाभले. तर विशेष सहकार्य विजयसिंह माने अध्यक्ष अशोकराव माने ग्रुप व जिल्हा परिषद सदस्य मनिषा माने, पती डॉ.निलेश चौगुले व कुंटुंबियांचे प्रेरणा मिळाले. पीएचडी संपादन केले बद्दल प्रा.प...

रायबाग तालुक्यातील बस्तवाड शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात "नावू माणुजरू" कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
रायबाग : सर्व मानव एकत्र असतील तेव्हाच समाज आणि देशाचा उद्धार होईल.  तालुका शारीरिक निरीक्षक महावीर जीराग्यळ म्हणाले की, देशाचे दीर्घ विश्व हे समरसतेचे वितळणारे भांडे असू शकते.  तालुक्यातील बस्तवाड शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी आयोजित ‘नवू माणुजरू’ कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, सर्व जातींनी कोणताही भेदभाव न करता एक होऊन काम केले तरच देशाची एकता व प्रगती शक्य होईल.  समाजशास्त्रीय चिंता हे माणसाचे खरे वैशिष्ट्य आहे.  ते म्हणाले की, विद्यार्थी हे महान भारताचे प्रवेशद्वार आहेत, सरकारच्या अशा कार्यक्रमांमुळे देशात समानतेचा संदेश जाईल यात शंका नाही.      मुख्याध्यापक सुखदेव कांबळे, एस.एस.संक्राती, मंगल कांबळे, जी.एस.पाटील, दीपा होसमनी, गायत्री होळकर, शांभवी होळकर, व विद्यार्थी उपस्थित होते.   अमर बबनावर यांनी कथन करून अभिवादन केले.

शिक्षण सप्ताह अंतर्गत सहाव्या दिवशी वृक्षा रोपण व संगोपन कार्यक्रम संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  मोरया प्रतिष्ठान सेलू व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू यांच्या संयुक्त उपक्रम. सेलू : दि. 27 जुलै 2024  सेलू  शहरातील  कस्तुरबा गांधी  बालिका विद्यालय येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत आज सहाव्या दिवशी भव्य अशा वृक्षारोपण व वृक्ष संगोपन कार्यक्र माचे आयोजन केले गेले. यावेळी व्यासपी ठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता वेडे, गृहप्रमुख श्रीमती प्रेरणा पवार मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर, सदाशिव बर्वे आणि सुजित मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सुनि ता वेडे यांनी केले. उप स्थित 150 विद्यार्थिनि ना मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी वृक्ष  संवर्धनाची व संगोप नाची शपथ दिली. यावेळी उपस्थित पालकांचा देशी वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून एक मूल एक झाड हा संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक पांडुरंग पाटण कर यांनी केले. तर आभार सुहास नवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सह शिक्षिका श्रीमती सुमि त्रा प...

सेलू येथे भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश मेळावा संपन्न झाला.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू :  दि. 28/07 /2024 वार रविवार रोजी सेलू येथे साई नाट्य गृह  येथे लहू क्रांती संघर्ष सेना आयोजित मातंग समाज परिवर्तन महा मेळावा व भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव, सुरेश नागरे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून नानासाहेब राऊत यांची उपस्थिती होती. या वेळी लहू क्रांती संघर्ष सेनेच्या पदाधि कारी यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात सुरेश भैय्यानी सांगितले कि, येणाऱ्या विधानसभा निवडणु कीत जनतेनी निवडुन दिल्यास सर्वच समाजा च्या हिताची कामे करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमात वैभव डख यांची युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी, माणिक हिंगे यांची युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष ओबीसी विभागपदी,बालासाहेब ताठे यांची सेलू तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पदी तसेच गंगाधर गाडेकर यांची सेलू तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी लहू क्रांती संघर्ष सेनेचे राजू कसबे, बाबासाहेब कांबळे,किशोर गवारे, संजय...

राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून कोल्हापूर महानगरपालिकेला निवेदन

इमेज
आज कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कोल्हापूरहून पुणे मुंबई कडे जाणाऱ्या मार्गावरील तावडे हॉटेल येथील कमानीवर छत्रपती शाहूमहाराज यांच्या नावाचा कमानीवर दोन्ही बाजूला बोर्ड लावण्यात आलेला आहे पण कमानीवरील एका बाजूचा बोर्ड हा पूर्ण पणे खराब झालेला आहे काही दिवसापूर्वीच हा बोर्ड त्या कमानीवर बसवण्यात आला होता आज राजे फाऊंडेशन कडून त्या कमानीवर डिजिटल बोर्ड न बसवता कायम स्वरूपी ऍक्रेलिक (लाईट)बोर्ड बसवण्यात यावा या विषयाचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा.राहुल रोकडे यांना देण्यात आले येत्या पंधरा दिवसात जर हा बोर्ड कमानी वरती दोन्ही बाजूला बसविण्यात नाही आला तर राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून कोल्हापूर महानगरपालिका प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.यावेळी राजे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र सचिव रशीद सय्यद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.नरेंद्र पोवार, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. संजीव भालेकर, कोल्हापूर जिल्हा सचिव मंजूर सय्यद, कोल्हापूर शहर महिला अध्यक्ष...

मांगुर फाटा येथे ओढावलेल्या महापूराची भागाची चिकोडी लोकसभा नवनिर्वाचित खास. प्रियांका जारकिहोळी यांनी केली पाहणी

इमेज
राजु मुंडे निपाणी  मांगुर फाटा येथे ओढावलेल्या महापूराची भागाची पाहणी चिकोडी लोकसभा नवनिर्वाचित खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी भेट देऊन पाहणी केली.  यावेळी मांगुर फाटा येथील महा मार्ग रस्ता कामातील भराव हटवणेबाबत पूना बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग कामात मांगुर फाटा येथील भराव मुळे कुर्ली ,भाटनागणुर, यमगरणी, कोडणी तसेच महाराष्ट्र हद्दी तील 15 गावात पुराचा धोका वाढत आहे त्यासाठी पर्यायी  पिलरपुल मंजूर आहे पणं पूर्वीचा चुकीचा भराव काढणे गरजेचे आहे.  नाहीतर येणाऱ्या महापुरणे सर्व जनतेचे प्रचंड नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी सबंधित विभागास आपण लक्ष घालून आदेश द्यावेत अशी मागणी  वेदगंगा नदी काठ शेतकरी बचाव कृती समिती सदस्यांनी निवेदन देऊन केली.

माजी आमदार मा.मालोजीराजे छत्रपती यांच्या कडून पूर परिस्थितीची पाहणी

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे कोल्हापूर शहरामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पूर आलेल्या भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले व ते भयभीत झालेले आहेत अशा परिस्थितीत माजी आमदार माननीय मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून कोल्हापूर शहरातील पूर आलेल्या भागात पाहणी करून त्यांना दिलासा देण्यात आला तसेच त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली माननीय मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर शहरातील शाहूपुरीतील कुंभार गल्ली, कदमवाडी,बापट कॅम्प, न्यू पॅलेस परिसर,वागळे मळा, चित्रदुर्ग मठ, पंचगंगा तालीम परिसर, रमणमळा,जाधववाडी अशा पूर आलेल्या विविध भागात जाऊन त्यांची पाहणी केली यावेळी त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आम.डी.एम.इहोळे यांनी रायबाग तालुक्यातील हळेदिगेवाडी गावाला भेट देऊन कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीची केली पाहणी. 

इमेज
रायबाग : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या बाधितांनी केअर सेंटरमध्ये आसरा घेऊन सुरक्षित राहावे, असे मत आमदार डी.एम.इहोळे यांनी व्यक्त केले.  रविवारी त्यांनी तालुक्यातील बावन सौंदत्ती, डिग्गेवाडी, जलालपूर, भिरडी या गावांना भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली, तेथील लोकांना प्रोत्साहन दिले आणि पत्रकारांशी संवाद साधला.  तहसीलदार सुरेश मुंजे यांनी महाराष्ट्रातील नद्यांमधून विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सांगितले.  पुराचा सामना करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  ते म्हणाले की, महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे.       ईओ अरुण माचकनूर, कृषी अधिकारी विनोद मावरकर, पशु अधिकारी डॉ.एम.बी.पाटील, गाव अध्यक्ष रामचंद्र काटे, रवी चौगुले, सीबीकेएसके उपाध्यक्ष तात्यासाब काटे, धुळागौडा पाटील, महावीर पाटील, महादेव गंगाई, मल्लाप्पा म्हैशाळे, सत्यापूर मासाळे, आप्पा पाटील, गंगापूर पाटील आदी उपस्थित होते. , प्रकाश मिरजे , अनिल हंजे ...

कृष्णाघाट - मिरज व ढवळी येथील पूरस्थितीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

इमेज
सांगली, दि. 28 संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. पूरस्थितीच्या अनुषंगाने शासन, प्रशासन ज्या सूचना देते त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. राज्य शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये तथापी दक्ष रहावे , असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.           पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज कृष्णाघाट मिरज व ढवळी येथील पूर परिस्थितीची पाहणी करून जनावरांसाठी चारा वाटप केले. ते पुढे म्हणाले, पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा, पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल. नागरिकांनी काळजी करू नये, येणाऱ्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करावा. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जावू नये तसेच स्वत:सह कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.       याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उत्तम दिंघे, मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, माजी आमदार उल्हास पाटील, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ...

भंगलेल्या संसारास न्यायदेवतेने दिली नवी दिशा

इमेज
यड्राव ( प्रतिनिधी )  शेडशाळ (  ता .  शिरोळ ) येथील अब्दुल रहीम  भालदार व नरवाड तालुका मिरज येथील मिलन भालदार यांचा 15 वर्षा पूर्वी मुस्लिम धर्मा चे रीती रीवजा नुसार विवाह झाला होता सदर लग्न संबंधातून 3 मुली ही त्यांना झाल्या होत्या पण गेल्या 5वर्षा पासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून मतभेद निर्माण झाले होते ते इतके टोकाला गेले की ते ऐकमेका चां तिरस्कार करू लागले .आणि त्यांनी ऐकमेकापासून ते गेल्या 5 वर्षा पासून विभक्त राहत होते .  अशा भंगलेल्या संसारास पुन्हा एक नवीन चांगली दिशा मिरज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वी . वी . खुळपे  या  न्यायदेवतेने दिला.  .          सदर  प्रकरणात या दोघांचे वकील ॲड ममतेश आवळे  कुरुंदवाड व ऍड पी ऐस भाटकर मिरज यांनी अथक प्रयत्न करून तसेच मिरज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माननिय वी वी खुळपे साहेब यांचे सहकार्याने गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेला वाद त्यांनी  राष्ट्रीय लोक अदालत मद्ये यशस्वी मीटवला तसेच त्यांना नवीन संसारिक गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्या दिल्या ....

कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ झाल्याने बावनसौंदत्ती-चिंचली रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प

इमेज
रायबाग : महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून तालुक्यातील बावनसौंदत्ती-चिंचली रस्ता तुडुंब भरला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.  गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये शिरल्याने शुक्रवारी सायंकाळी अंकली-चिंचली रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.   उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील पूज्य देवी असलेल्या चिंचली मायाक्का देवाकडे जाण्यासाठी हा मुख्य मार्ग असून डिगेवाडी, भिरडी, बावनसौंदत्ती परिसरातील लोकांसाठी हा मुख्य रस्ता आहे. 

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, नदीकाठचे लोक आपल्या जनावरांसह घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित

इमेज
रायबाग : तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत असून नदीकाठचे लोक आपल्या जनावरांसह घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होत आहेत.       तालुक्यातील बावन सौंदत्ती गावात कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी घरापर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच घरे रिकामी करावीत, आत्ताच सुरक्षित स्थळी जावे किंवा केअर सेंटरमध्ये जावे. सरकारने उघडले.  अध्यक्ष रामचंद्र काटे, सदस्य अनिल हंजे, अजित खेमालापुरे यांनी आवाहन केले.         सुरेश मुंजे, तहसीलदार रायबाग: "तालुक्यातील कुडची आणि बावन सावदत्ती गावातील शासकीय शाळांमध्ये गर्जी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमी होईपर्यंत नदीकाठच्या लोकांनी आश्रय घ्यावा."       तसेच बावनसावदत्ती गावात कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने ग्रा.पं.अध्यक्ष व सदस्यांनी आवाहन केले.

मुलांनो! योगासनं वाढवतील, आपली अभ्यासातील एकाग्रता - अशोक अंभोरे

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू येथे परभणी जिल्हास्तरीय निवड चाचणी व योगासन स्पर्धा. सेलू :अनेक वेळा मुलांना एखादा धडा पाठांतर केल्यानंतरही लक्षात राहीत नाही. मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटत असेल तर मुलांची एकाग्रता आणि फोकस वाढ विण्यासाठी त्यांनी योगासनं करायलाच हवेत, असे प्रतिपादन सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार  अशोक अंभोरे यांनी केले. शनिवार, दि.२७ जुलै रोजी परभणी जिल्हा योगासन असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योगा परिषद यांच्या वतीने परभणी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेच्या निवड चाचणी निमित्ताने ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमा चे अध्यक्ष मुख्याध्या पक एस. व्ही. पाटील तर प्रमुख उपस्थिती डॉ. शैलेश मालानी, युवा नेते संदीप बोकन, उपमुख्याध्यापक के. के. देशपांडे,  प्रा.नागेश कान्हेकर उपस्थित होते.यावेळी बोलतांना त्वचारोग तज्ञ डॉ.शैलेश मालाणी म्हणाले की, पालकांना मुलाच्या अभ्यासाची चिंता वाटत असेल, मुलांनी एखादा धडा बऱ्याच वेळा पाठांतर करूनही त्यांना लक्षात राहत नसेल तर मुलांची एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी त्यांच्या रुटीनमध्ये या ...

राज्यातील गुणवंत कामगारांना इतर विभागाप्रमाणे लाभ देणार- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

इमेज
नांदेड- इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बाल गंधर्व नाट्य मंदिर ता. मीरज जि. सांगली येथे दि. २६ जुलै २०२४ शुक्रवार रोजी सत्कार समारंभ पार पडला. गेल्या दोन वर्षामध्ये कामगार मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये राज्यातील सर्व गुणवंत कामगारांना राज्य शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कारार्थी प्रमाणे लाभ देणार असल्याची ग्वाही राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्यावतीने गेल्या दोन वर्षांमध्ये मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कामगार विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कामगार मंत्री मा.ना. डॉ. सुरेश खाडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे व कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार यांचा अंबाबाईची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सुरेश खाडे यांनी मंत्री पदाचा पदभार...

मांजरी कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ, नागरिकांचे स्थलांतर

इमेज
रायबाग : महाराष्ट्र राज्यातील जलाशयातून पाणी सोडल्याने आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे खबरदारीचा उपाय म्हणून रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती गावात शुक्रवारी सकाळपासून नदीकाठावरील नागरिक आपापल्या घरातून सर्व सामान व पशुधनासह सुरक्षित स्थळी हलवत होते. 

नाईट कॉलेज इचलकरंजी चे पुरपरिस्थीतीत प्रशासनास मदत.

इमेज
यड्राव (प्रतिनिधी )  नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अति पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेच्या पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात येते या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शिरदवाड रोड पूर परिस्थिती मुळे बंद आहे तसेच या उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पूर् नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने नदीवेस नाकाबंदी केलेल्या ठिकाणी जाऊन मदत केली यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण यांनी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्ण नियंत्रण याविषयी माहिती दिली सदरचा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंदर नारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक किशोर आंबुडकर महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान तुषार हेगडे, रिलायन्स जिओचे मॅनेजर श्री परशुराम बोटे , सुनिल आवळे,नवल कुरणे,प्रा सौरभ पाटणकर, प्रा अभिजीत पाटील,प्रा...

आई खाऊ देईना आणि बाप भीक मागू देईना महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग योजना अडकल्या दलाल आणि अधिकाऱ्याच्या कचाट्यात! प्रदिप कामठे.

इमेज
महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दिव्यांग भव्य क्रांती संघटना.    महाराष्ट्रातील दिव्यांगाच्या योजना सरकार शासन निर्णय खिरापती सारखे काडत आहे परंतु ते कितपत दिव्यांगाच्या फायदयाचे आहे आणि प्रभावी अंमलबजावणी होते काय? याचा सरकार कडे कोणताही प्ल्यान नाही शासनाने 2003साली दिव्यांग आर्थिक महामंडळ सुरु केल व आता तरी दिव्यांगाचे भले होईल परंतु या योजने अंतर्गत किती दिव्यांगाचे पुनर्वसन झाले याचा डेटा मात्र शासना कडे उपलब्ध नाही. या बाबत बारकाईने अवलोकन केल्यास या योजने अंतर्गत 2003ते 2006पर्यंत जिल्हा निहाय केवळ 20ते 25दिव्यांगाना कर्ज वाटप केल तेही दिलेल्या कर्जात एकही दिव्यांग सुकी झाला नाही. तो पुढील 5% ग्रामपंचायत च्या निधी कडे लक्ष ठेवून आहे तेही महाराष्ट्र राज्यातील 80% ग्रामपंचायत निधी च वाटप करत नाही. त्यामुळे मग महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग संजय गांधी पेन्शन (मानधन )च्या आधारावर अवलंबून बसलेला दिसतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकार दिव्यांगाचे शिक्षण, पुनर्वसन करण्यात नाकामी ठरल आहे. दिव्यांगाना योजना दिव्यांगा च्या पदरात पाडून घेण्यासाठी दिव्यांगाना अ...

बालिंगा येथील जुना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद. अत्यावश्यक सेवेतील वाहतुक राहणार सुरु

इमेज
कोल्हापूर, दि. 25  राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. 2, कोल्हापुर या विभागाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी (कोल्हापूर-बालींगे-कळे- साळवन - ते गगनबावडा) या रस्त्याच्या किमी 79/500 (बालींगे -भोगावती नदी) येथील अस्तित्वातील जुन्या दगडी कमानी पुला खालून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळी पर्यंत पोहोचली आहे. पुढील काही दिवसांच्या हवामान खात्याच्या अंदाजवरुन जिल्ह्यात पाणी-पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे, या परिस्थीतीचा विचार करुन रस्ते वाहतुक सुरक्षित ठेवणे व पुढील वित्त व जिवित हानी थांबविण्यासाठी बालींगे येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.2 चे उपअभियंता आर.बी.शिंदे यांनी दिली आहे. पुराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपासून खाली पोहोचेपर्यंत या पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा उदा. रुग्णवाहिका, दुधाच्या गाड्या, भाजीपाला वाहतुक सुरु राहील. स्थानिक नागरिक व या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनास सहकार्य करा...

पूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे कोल्हापूर शहरातील पुराचा धोका प्रत्येक वर्षी वाढत आहे. यामुळे पूरबाधित नागरिकांसाठी सुसज्ज निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करा अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी आज महापालिका प्रशासनास दिल्या. निवारा केंद्रास निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.पुराची पातळी धोका पातळीकडे जात असल्याने शहरातील विविध भागांतील पूरग्रस्तांसाठी ठिकठिकाणी ३१ निवारा केंद्रे महापालिकेने सज्ज केली आहेत.ही सर्व केंद्रामध्ये नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे.आज सुतारवाड्यातून चित्रदुर्ग मठात आलेल्या स्थलांतरित केलेल्या नागरिकांशी आमदार जयश्री जाधव यांनी संवाद साधला. या संकटकाळात पूरबाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगीतले व धीर दिला.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या,प्रत्येक वर्षी पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. यासाठी महापालिका प्रशासनाकडे आरक्षित असलेल्या जागांवरती निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा आणि तो शासनास सादर करावा.या प्रस्तावास मंज...

कृष्णाकाठची जनावरे स्थलांतरित

इमेज
अकिवाट प्रतिनिधी / सचिन मठपती    अकिवाट  तालुका शिरोळ येथील आलास पाणवठामळी भाग येथील शेतकऱ्यांनी आपली जनावरे व वाळला चारा ओला चारा पशुखाद्य ट्रॅक्टर ट्रॉलीतून सुरक्षित ठिकाणी आणत आहेत जनावरे आणण्यासाठी मित्रमंडळी व पै पाहुणे मदत करताना दिसत आहेत. तांबोळी रजपूत, कोळी ,आवटी, गजण्णावर पुदाले,नरवाडे,माणगावे, रायनाडे, या सर्व शेतकऱ्यांचे 200 हून जनावरे आहेत. यामध्ये जर्सी गाय, मुराळ म्हैस अशा जातीच्या किमतीचे जनावरे असलेने लंगोटे ओढयात जास्त पाणी आले म्हणजे जनावरे  सुरक्षित ठिकाणी आणता येत नाही म्हणून मंगळवारी 23 जुलै रोजी बर्यापैकी  जनावरे अलीकडे आणलेत व आणत आहेत.युवा शेतकरी उमेश आवटी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असे म्हणाले की पाण्याला म्हणावं तेवढा जोर नाही परंतु हा मार्ग बंद झाला तर जनावरे अलीकडे आणायला जिकीरीचे व त्रासाचे होते अन प्रशासनाच्या सूचनेनुसार आमची जनावरे सुरक्षित ठिकाणी आणलो आहोत.

रायबाग : तालुक्यातील कुडची पुलावर तहसीलदार सुरेश मुंजे यांनी कृष्णा नदीच्या पाणी पातळीचे केले निरीक्षण

इमेज
रायबाग : तालुक्यातील कृष्णा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मंगळवारी पहाटे नदीकाठच्या गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्याचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनी सांगितले.  मंगळवारी नगर येथील तहसीलदार कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कुडची पुलावरून कृष्णा नदी वाहत असल्याने काल रात्रीपासून मिराजा-जमाखंडी राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक रोखा.  पुराची खबरदारी म्हणून नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून, तालुका प्रशासनाकडून पुराचा सामना करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.  40 केअर सेंटर आणि 40 शाळा तयार करण्यात आल्या आहेत.  आता राजापूर बॅरेजमधून १ लाख ५० हजार क्युसेक पाणी सोडले जात असून पुलावर वाहत असल्याची माहिती त्यांनी दिली.

कवी कालिदासाचे लेखन हे संस्कृत साहित्याला देणगी -प्रा. मोहन पाटील.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  एक दिवस एक पुस्तक उपक्रमक्रांतर्ग कार्यक्रम. सेलू : दि. 23 अलौकिक प्रतिभेचे धनी कवी कालिदास यांचे लेखन हे संस्कृत साहित्याला देणगी आहे. कवी कालिदासा च्या रचना या प्रत्यक्ष वाचून अनुभवायला हव्यात असे प्रतिपादन नूतन महाविद्यालया तील संस्कृत विषयाचे प्रा. मोहन पाटील यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमाच्या विसाव्या भागात ते कवी कालिदास यांच्या ‘मेघदूत’ या पुस्तकावर सोमवार (दि. 22) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. महेंद्र शिंदे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून नूतन कन्या प्रशालेतील संस्कृतचे सहशिक्षक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची उपस्थि ती होती. पुढे बोलताना प्रा. मोहन पाटील म्हणाले की, कवी कालिदासाचे मेघदूत हे पतीपत्नीच्या हळुवार प्रेमाची आणि विरहाची कथा आहे. ही कथा काळजाचा ठाव घेते. ‘मेघदूत’ वाचनाने नवतारूण्य प्राप्त होते. प्रमुख वक्ते डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले की, ‘कवी कालिदासांचे ‘मेघदूत’ हे लिहिण्या च्या संस्कृतीचा वारसा सांगणारे महाक...

कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर गावात नुकत्याच झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी

इमेज
रायबाग : महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर गावात नुकत्याच झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी एकता सोशल वेलफेअर फाऊंडेशन व मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी सोमवारी ग्रेड 2 तहसीलदार डी.एस.जमादार यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले.                 महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर गावात जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने काही समाजकंटकांनी मुस्लिम धर्माच्या पवित्र धार्मिक वास्तूंवर हल्ला करून मुस्लिम लोकांवर हल्ला केला आणि पवित्र ग्रंथ कुराणची प्रत जाळली.  ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे.      अध्यक्ष परमानंद मंगसुली, फाउंडेशनचे अध्यक्ष इनूस अत्तार, अब्दुल कानवाडे, कार्यालय डोंगरे, शफीउल्लाह गोलंदाज, सलामान पठाण, उबेदा मुल्ला, अझरुद्दीन मुल्ला, इरफान मौलाना, मुनिर मौलाना, इमामहुसेन मोमिन, रफिक खलिपासह अनेकजण उपस्थित होते.

गुरुमध्ये करुणा असेल तरच असे गुरू समाजासाठी चांगले मार्गदर्शक ठरू शकतो : शिवशंकर स्वामीजी.

इमेज
रायबाग : ओंकार आश्रमाचे शिवशंकर स्वामीजी, बावन सौंदत्ती म्हणाले की, गुरुमध्ये करुणा असेल तरच असे गुरू समाजासाठी चांगले मार्गदर्शक ठरू शकतात.      तालुक्यातील बावन सौंदत्ती गावातील ओंकार आश्रमात रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना संबोधित करताना ते म्हणाले की, जो भक्तांना योग्य मार्ग दाखवतो तोच खरा गुरु होतो.  जीवनात योग्य मार्ग दाखविणाऱ्या गुरूचे सर्वांनी स्मरण करावे.     शिव भजने मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला.  आप्पासाहेब भिस्ते व गंगाधर कुंभार दाम्पत्याने श्रींची पाद्यपूजा केली.      मातोश्री ब्रह्मरंबिका, मातोश्री नागलंबिका, ग्रा.पं.  अध्यक्ष रामचंद्र काटे, अनिल हंजे, अजित खेमलापुरे, शांतीनाथ पाटील, सत्यप्पा भिस्ते, बीएम पुजार, प्रकाश भिस्ते, मारुती चौगले, जिन्नाप्पा चंपू, चिदानंद मंगसुळे, अजित कुंभार, उल्लास मिरजे, श्रीकांत मंगसुळे, कुमार कुंभार, शिवनाथ मंगसुळे, महालिंग शास्री, श्रीकांत मंगसुळे, दयानंद हिरेमठ आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतील : अनिलकुमार बिरादार.

इमेज
रायबाग : राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतील, असे हुब्बरवाडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी अनिलकुमार बिरादार यांनी सांगितले.  तालुक्यातील हुब्बरवाडी ग्रामपंचायतीच्या सभा भवनात शिक्षण प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाच्या वतीने सोमवारी सात दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.   राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.  या विशेष शिबिरासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी रोपांना पाणी पाजून सुरुवात केली.  त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा.पी.आर.सवदत्ती यांनी भाषणे करून शिबिरार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश व सात दिवस चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.  यावेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस.कुराबेट्टी, व्याख्याते एस.एम.  लैनदार, आर.एस.कांबळे, आय.आर.पत्तार, एम.आर.कठारी, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या सचिव,अनुप मनगुत्ती, ग्रामपंचायत सचिव दशरथ भोसले, सदस्य रेवप्पा नाईक, शिवू बाबलेश्वर, सदानंद चौगला कर्मचारी युसूफ हुडेद आदी उपस्थित होते. ...

अकिवाटचे प्रगतशील शेतकरी तात्यासाहेब सदलगे यांची नाथ कु.ऋतूजा पाटील(जयसिंगपूर)हिचे सी.ए.परिक्षेत यश

इमेज
अकिवाट वार्ताहर / सचिन मठपती        जयसिंगपूर येथील कु.ऋतूजा रामगोंडा पाटील हिने मे २०२४ मध्ये झालेल्या सी.ए.परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.तिचे प्राथमिक शिक्षण दिप पब्लिक स्कूल जयसिंगपूर तर उच्च माध्यमिक शिक्षण डी.के.टी.ई कॉलेज इचलकरंजी येथे झाले आहे.या यशासाठी आई,बाबा यांची प्रेरणा शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन तर मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले.अकिवाट येथील प्रगतशील शेतकरी तात्यासाहेब सदलगे यांची ती नाथ आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : येथील विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात गुरुपौर्णिमा  उत्सहात संपन्न झाली . कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महर्षि व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे  यांनी केले .उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला .  नविन प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून शालेय गणवेश , स्कूल बॅग व शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी विद्यार्थी अमृता लाड , हर्षदा चव्हाण , चैत्राली सावळे , ओंकार लाड , श्रावणी चव्हाण , अस्मिता कांबळे , महेक शेख इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात गुरूच महत्व विशद केले . रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव मेजर के. एम् भोसले व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन सदस्य अमित जाधव यांचा सत्कार करण्यात आला . संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे यांनी गुरुचे आपल्या जिवनातील असलेले महत्त्व याविषयी माहिती दिली . आभार...

हरित सेना व रयत संघ तालुका युनिटच्या वतीने शहरातील रयत संघ कार्यालयात आयोजित ४४ व्या शेतकरी हुतात्मा दिन साजरा

इमेज
रायबाग : शेतकरी नेते मायगौड पाटील म्हणाले की, नवलगुंद आणि नरगुंद शेतकरी संघर्षात ज्या शेतकऱ्यांनी प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ शहीद शेतकरी दिन साजरा करण्यात येत आहे.   हरित सेना व शेतकरी संघटना तालुका युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४४ व्या शेतकरी शहीद दिनाचा एक भाग म्हणून रविवारी नगर येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात प्रा.एम.डी.नंजुंदस्वामी पुतळ्याला  पुष्पहार अर्पण करून, त्यानंतर शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांना पुरेशी दुष्काळी मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या पंप संचांना मीटर जोडावेत, शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांसाठी घातक असलेला भूमी सुधारणा कायदा रद्द करावा. , शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांना शास्त्रोक्त भाव ठरवून शेतकऱ्यांचे कर्ज कमी करून कोटबागी, ​​हनुमान ऐत सिंचन योजना माफ करून शेतकऱ्यांच्या जमिनी लवकरात लवकर बागायती कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.  यावेळी तालुकाध्यक्ष विजय श्रेष्ठी, निजगुणी नावी, श्रीशैला साबानी, रायगौड पाटील,सावंत कोचेरी, अप्पासाबा माने, रवी पाटील, त्यागराज कदम, सुलतान पुजारी, कालगौड पा...

रायबाग: शहरातील सोनिया कन्नड प्राथमिक शाळेत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ डॉ. एस.के. गुडोदगी यांच्या हस्ते संपन्न.

इमेज
रायबाग : सांगली सांगोलकर रुग्णालयातर्फे शहरातील स्त्रीरोग व हृदय रुग्णांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा रायबाग गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे मत डॉ.राहुल बंते यांनी व्यक्त केले.  सोनिया एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि सांगोलकर हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहरातील सोनिया कन्नड प्राथमिक कन्नड शाळेत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी होताना ते म्हणाले की, आजच्या काळात निरोगी जीवन जगणे अत्यंत गरजेचे आहे.  प्रत्येकाने दर 6 महिन्यांनी तपासणी करून निरोगी जगावे.   रवींद्र सांगोलकार, डॉ.  राहुल सांगोलकार, डॉ.  एस.के.गुडोदगी, अब्दुलसत्तार मुल्ला, एच.  एल.  पुजारी, डॉ.  रेवती बंते, हरीष कुलगुडे, विद्याधारा कुलगुडे, श्रीकांत सांगोलकार, वाय.  एस. बंतेशेरी रुग्णालयाचे कर्मचारीही तेथे होते.

गुलमोहर कॉलनी वासीया तर्फे पवन आडळकर यांचा सत्कार.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू :- सेलू येथील गुलमोहर कॉलनी मधील राहिवाशी तर्फे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर व रवी सुरवसे यांचा दिनांक 18/07/24रोजी सायं 7 वाजता हार, शाल देऊन सत्कार करण्यात आला. कॉलनी मध्ये सध्या पावसाळा चालू  असल्याने पावसाच्या पाण्याची व्हिलेवाट साठी नाल्या नाहीत त्यामुळे  फार त्रास होत आहे व रस्ते, कचरा ,घन्टा गाडी इत्यादी बाबत प्रश्नाचे कार्य हाती घेण्यासाठी मागणी करण्यात आली होती  त्यानुसार त्यांनी लागली च नाल्या बांधकाम पुर्ण करण्याची आश्वासन देण्यात आले.  या वेळी कॉलनी तील हाजी युनूस कुरेशी, हाजी नूरमोहमद ईशानी, हाजी मोईन भाई, हाजी सत्तारभाई बागवान, मजीद भाई बागवान,  कदीर भाई, शेख शकील भाई, रशीदखा इजिनिअर, नईम बागवान, शेख रहीम टेलर,आसेफ कुरेशी, मुनाफ बागवान, मौजम सर,अकबरखा , शेख हुसेन निसार पठाण, सयद जावेद, हनीफ ईशानी, अफजल ईशानी,इम्रान कुरेशी, शोएब शेख यांची उपस्थिती होती.

दानशुर व्यक्तींनी सामाजिक कार्य कर्त्यांचे हात बळकट करावे-मुंजाभाऊ भिसे.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  हुतात्मा बहिर्जी शिंदे स्मृती दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप. सेलू :  समाजातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणा साठी मदतीची गरज असते सामाजिक कार्यकर्ते ती मदत त्यांच्या पर्यंत पोहच वण्यासाठी प्रयत्न करतात त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांचे हात बळकट करावे असे आवाहन  मुंजाभाऊ भिसे यांनी केले. दि.19 जुलै शुक्रवार रोजी  कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात  हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या स्मृतिदिना निमित्त  कै.दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतुन सुरू असले ल्या हात मदतीचा या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे  म्हणून ह भ प प्रसाद महाराज काष्टे,  मनिष बोरगावकर, संस्था सचिव चंद्रप्रकाश सांगतानी डाॅ,आशिष डख, डाॅ,अशोकराव नाईकनवरे,डाॅ,शिवाजीराव शिंदे, संयोजक सुनिल गायकवाड, प्रल्हादराव कान्हेकर, बंडू नाना कदम,  शुकाचार्य शिंदे, पि.के. शिंदे, विष्णू बागल,  मुख्याध्यापक डी. डी.शिंदे,बि.आर साखरे उपस्थित होते. प्रास्ता विक मुख्य मार्गदर्शक सुनील गायक...