पाणीपट्टी व बेकायदेशीर गाळा भाडेवाढ रद्द करणे बाबत मनसे, शिवसेना (शिंदे गट),व स्वाभिमानी शेतकरी संघटना,यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
हुपरी प्रतिनिधी - सागर पाटील.दि.31, हुपरी नगरपरिषद यांनी पाणीपट्टीदरामध्ये 2300 व गाळा भाडेवाढमध्ये 2000 अशी दुपटीने वाढ केलेली आहे. ती तात्काळ थांबवुन लोकांना वेठीस धरू नये. अन्यथा या विरोधी उग्र आंदोलन करण्यात येईल व मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल. असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील (अण्णा) यांनी दिला. यावेळी मनसे,शेतकरी संघटना, शिवसेना (शिंदे गट) यांनी मुख्याधिकारी अशोक कुंभार यांना निवेदन दिले. यावेळी मुख्याधिकारी यांना ही वाढ तात्काळ रद्द करावी अन्यथा गाव बंद व आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले. पाणीपट्टी वाढ करून पिण्याचे पाणी आठ दिवसातून एकदा सोडले जाते पाण्याची बोंबाबोंब ऐन पावसाळ्यात सुरुवात झाल्याने लोकांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी यांना काहीच उत्तर देता आले नाही. पाण्याच्या टाकीतुन हजारो लिटर पाणी वाया जाते.टाक्याची गळती काढता येत नाही.लोकांचा विरोध डावलुन जनतेचा रोष अंगावर घेऊन नंतर मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण मोहीम राबवली ती पण अर्धवट सोडून दिली. तरी यामधे नुतन मुख्याधिकारी य...